"हे काय नाटक चालू आहे... साला काम करतोय का चेष्टा... :( नो जॉब सॅटिस्फॅक्शन... वरून ह्यांचे दर सहा महिन्याला पर्फॉर्मन्स रिव्हु... त्यात GOALs कॉलम मध्ये वेगळं नाहीच.. फक्त एंप्लॉयी कमेंटस बदलत्या पाहिजेत... प्रमोशन साठी विचारलं तर साले १० कारणं देतात.. त्यात पुन्हा ऑनसाईट चे ठरलेले गाजर आहेच की... !! @#$@$@$@# यार... डोक्याला ताप झालाय नुसता ! -- ए छोटू अजून एक कटिंग आण...." !! सनी वैतागून म्हणाला आणि पुन्हा परफॉर्मन्स रिव्हयु चे डॉक्युमेंटस वाचायला लागला.... अजितने सनी च्या संपलेल्या कपाचा ऍश ट्रे करत उरलेली सिगरेट टाकून देत, ऑर्डर कंटिन्यू केली... एक कटिंग सोबत एक लाईटस आणि १ टोस्ट बटर पण आण रे SSS.. !
अरे छोड यार सनी, किती दिवसानी भेटलोय, भरशील तो फॉर्म नंतर... साल्या बाकी कसं चालु आहे ते बोल...
(अजित आणि सनी, २ वर्षांपुर्वी एकाच कंपनीत एकाच डिपार्टमेंट मध्ये काम करत होते.. तिथे गळचेपी सुरू झाली आणि गोष्टी असह्य झाल्यावर सनी ने नोकरी बदलली... पण अजित ला लगेच बदल करणे शक्य नव्हते कारण अजित च्या घरी 'छोकरी' चे विषय सुरू होते... लग्न ठरणार होते वर्षभरात त्याचे...त्यामुळे काही काळ अपमान गिळून काम करणे त्याने पसंत केले... )
बाकीचं काय यार... आपले जुने दिवस आठवतात नेहमी... तासन-तास खुर्चीवर बसून रीपोर्टस बनवत दुपार जायची... दिवसभरात ५मी. चहाला, जेवायला २० मी. आणि संध्याकाळी सगळी कामं झाली, शिफ्ट संपली की तासभर आण्णाच्या टपरीवर चहा.. !! बारा बारा तास आपण ऑफिस मध्ये काढायचो.... एक एक रिपोर्ट वर ऍनालिसीस करून करून समाधान/डोकं आउट होईपर्यंत टिम लिडर आणि मॅनेजर शी भांडायचो... अरे एवढं असून सुद्धा तिथे एक satisfaction असायचं, आला दिवस नुसताच पुढे गेला नाही... उलट सार्थकी लागला... काहितरी नवीन शिकायला मिळालं.. अन नाहीच तर निदन जुनी कामं तरी पुर्ण झाली... समाधानानी घरी जायचो... !!
साला इथे आलो तर पहिले "टीम" स्टेबल नाही, त्यात पॉलिटिक्स तर सगळीकडेच असतं पण हेल्दी पॉलिटिक्स असेल तर काम करायला हुरुप न चेव तरी येतो.. इथे राजकारण म्हणजे इतक्या खालच्या थराला असतं.. एकमेकांना KT -ज्ञान वाटून वाढतं हा मुद्दाच डोक्यात नाहीये ह्यांच्या.... तुझं काम तु दुसर्याला शिकवलं म्हणजे तुझी गरज संपली = तुझी नोकरीवर गदा ! ही घाणेरडी मेंटॅलीटी आहे इथे... !!
आपण म्हणायचो.. माझ काम तु शिक.. मग मी पुढे जायला मोकळा... इथे माझं काम मीच करणार आणि शिकवायला सांगितलं तरी साला सगळं नाही शिकवणार.. म्हणजे परत पाय धरायला कोणितरी आलं पाहिजे ना आपले... !! बकवास--बुल्शीट--- @##$@$ !!
-- अरे सनी, माझ काय वेगळं आहे, तु निदान नवीन लोकांसोबत आहेस म्हणून हे बोलतोय्स तरी.. मला तर ते बोलुनही वैताग आलाय... काय करायचं सांग !!
- काम आहे..करायचं अन जायचं....जास्त मनाला लाउन घ्यायचं नाही... अगदीच सहनशीलतेच्या बाहेर गेलं तर राजिनामा !! अरे आज किमान २०० कंपन्या आहेत... कुठे ना कुठे नक्की काम मिळेल... टॅलेंटेड माणुस कुठेही चालून जातो... जुन्या कंपनीने आपल्याला टॅलेंट दिलय.. ते आता वापरायचं.. हे असले लोक, आणि त्यांची थेरं सगळीकडे मिळतातच !!
आपल्या मॅनेजरनी सोडून जाताना सांगितलेलं लक्षात आहे ना ? -- pain is unavoidable -- but suffering is !!
--अरे अज्या मला माहीत आहे रे, पण हे कुठेतरी बोललो ना कि, मग सोमवारी कामावर जाताना मुड ठिक तरी असतो.. नाहितर तेच तेच डोक्यात राहून डोकं आउट होत !! आज ४ वर्षांच्या नोकरीत काय कमावलं असा विचार मनात आला कि लिस्ट मध्ये सर्वांत टॉप ला नावं येतात ती तुझ्यासारख्या मित्रांची - जे चांगल्या-वाईट सर्व प्रसंगात समान साथ देतात... आपले जुने मॅनेजर ज्यांनी शिक्षणासोबत कॉर्पोरेट मध्ये रहायचे कसे वागायचे कसे त्याची ओळख करून दिली... मग पॅकेज,अनुभव,सोयी बाकिच्या गोष्टी सगळ्या दुय्यम वाटतात. ! वैताग आला, डोकं उठलं की तुम्हाला फोन करतो.. आपण भेटून गप्पा गोष्टी / शिविगाळ / सिस्टिम चे उणे दुणे/ आपल्या कमजोरी / नवीन उपाय-योजना... इ. इ. वर चहा-नाष्टा करत गहन चर्चा करतो... आणि मग भेटायला येताना मनात जी उदासी,वैताग,फ्रस्ट्रेशन ई. ओझ असतं ते घरी जाताना एकदम हलकं होउन जातं.. !! पुढचा आठवडा/महीना ह्या टॉनिक वर सहज जातो...
आणि अति झालं कि पुन्हा आहेच -- गुडलक मधले राउंड टेबल, कटिंग चहा, तुझी सिगरेट, तीचा धुर माझ्या तोंडावर आला की तुला एक शीवी आणि मग त्या अनुशंघाने आपल्या डोक्यात जाणाऱ्या बाकिच्या तमान गोष्टींवर टिकास्त्र !! पुन्हा सोमवारी ऑफिस ला जायला गडी- जैसे थे !
"अजित आणि सनी सारखे आज अनेक लोक आहेत... जे वेगवेगळ्या कट्ट्यांवर बसतात... वेगवेगळ्या वेळी भेटतात...त्यांच्या चर्चा वेगळ्या, मांडणीची स्टाईल वेगळी, डोकेदुखीचे मुद्दे वेगळे.. पण एक दुवा COMMON (सारखेपणा) असतो तो म्हणजे.. . त्यांना मिळणारी एनर्जी !! एकमेकांना भेटून सुख:दुखाःच्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद हा सर्वात मोठा दुवा आहे... आणी ह्यातलीच जी स्थितिज उर्जा आहे ती पुढील भेट होईपर्यंत गतीज उर्जेच्या रुपाने त्यांना साथ देते... !!"
चवथी-पाचवीतील पुस्तकातील स्थितिज उर्चा आणि गतिज उर्जेचा खरा संबंध आज कळला... !!
-
आशुतोष दीक्षित
इथून तिथून जे जे वाचतो/पाहतो,
त्या सगळीकडून प्रेरणा घेउन काही बाही लिहायची सवय लागून गेली होती....
ते सगळे वैचारिक धन (निदान स्वतःच्या दृष्टीने) एकत्र एका जागी राहावे म्हणून हा प्रयत्न..
येथे येणाऱ्या 'कट्टा' मेंबरनी
दिलासा/उमेद/मस्करी/थट्टा/ एकंदरितच ह्या जगण्यच्या धावपळीत एकमेकांना प्रसन्न होण्याचा/हसण्याचा मौका घ्यायचा आणि द्यायचा....चलनी नोटांचे काम नाही,फक्त दिल से दिल का रिश्ता...
Friday, November 5, 2010
Wednesday, October 20, 2010
चित्रपट परीक्षण: रामायण -द एपिक ! पैसा वसुल !
~~ रामायण ~~
मला वाटतं की लहान थोरांपासून ज्यांना बोलता वाचता येत असा एकही माणूस नसेल ज्याला 'रामायण' माहीत नाही. तोच तोच विषय पुन्हा पुन्हा येऊन देखील आणि त्यावर अनेक चित्रपट/सिरियल्स बनवल्या जाऊन देखील चेतन देसाई ने हवा तसा परिणाम साधला आहे. !
संगीत दिलखेचक नसले तरीही त्याचा योग्य वापर करण्यात यश आले आहे, ऍनिमेशन सुपर्ब आहे, मी स्वतः जवळ जवळ ४ ऍनिमेटेड रामायण पाहिले आहेत -- त्यातले सर्वात सुंदर - "रामायण- द लिजेंड ऑफ प्रिन्स राम" च्या तुलनेत आजचा सिनेमा थोडा कमी पडतो, अर्थात रावणासाठी अमरिश पुरी ने दिलेला तो आवाज अजरामर आहे --- त्याच्या जवळपास सुद्धा आशुतोष राणा पोचू शकला नाही हे खरे... ! परंतु भारतीय ऍनिमेशन चे प्रयत्न नक्कीच वाखाणण्यांजोगे आहेत !!
चित्रपटाचे कथानक वेगळे काय सांगू ? सर्वांना माहीतच आहे परंतु काही बाबी आवडल्या त्या आवर्जून सांगाव्या वाटत आहेत -
१) राम वनवासात जाताना दशरथाची दुर्दैवी अवस्था उत्तम मांडली आहे -- (त्यातच ह्या 'अयोध्या खटल्या'च्या पार्श्वभूमीवर)--दशरथाचा --> "राम... मत जाओ राम.. . ये राजपाठ तुम्हारा अपना है... अयोध्या तुम्हारी है राम... मत जाओ" हा डायलॉग ला आपसूक मनात अभिमान निर्माण होतो.
२) ऊर्मिला राजवाड्याच्या सौंधातून लक्ष्मण/राम/सीतेला निरोप देते तेव्हा तिच्या डोळ्यातला अश्रू, आणि त्याच अश्रूंचा पुढे नाव वल्हवतानाचा उडालेला थेंब - ह्या ऍनिमेशन ला १०० मार्क्स !!
३) रामाचा वनप्रवास अयोध्या ते दंडाकारण्य, पंचवटी, सीतेचा शोध घेण्याचे रस्ते ही मार्गक्रमणीका मॅप च्या साह्याने उत्तम दाखवली आहे.
४) सगळीकडून रावणाचे दूत पक्षांमार्फत खलिता पाठवून संपर्कात असतात- तो खलिता पक्षी कॅच करतो.. तोंडात पकडतो ते ऍनिमेशन मस्त आहे
५) हनुमान प्रचंड (अगदी HUGE) पीळदार दाखवला आहे --बघूनच आपोआप मनोमन हात जोडले जातात.
६) माकडांचे गाणे 'हम से है खुशियाँ' मस्त आहे-- लहान मुलांना आवडेल नक्कीच !!
७) रावणाच्या राजसभेत प्रत्येक आसनावर रावणाचे अंतर्मन (इथे ट्रिक पक्की जमलीये.. ) त्याला सूचना/सला देताना पाहून भारी वाटतं !! आणि प्रत्येक वेळी रावण सभेत "हम....-- राक्षस है" !! ची आरोळी देऊन जोष वाढवत असतो !!
८) सर्वांत अंतिम युद्धामध्ये जेव्हा रावण युध्धभूमीवर येतो आणि मंत्रोच्चार करत स्वतःचे एकाचे हजार - दश हजार - शत हजार प्रती रावण (थोडक्यात CLONE )बनवून हल्ले करतो ते खूप आवडले.. !
9) सीता स्वयंवरामध्ये रामाचे उपरणे हात वर नेला कि खाली घरंगळते तो इफेक्ट जबरदस्त जमलाय....
मुद्देसूद उत्तम बांधणी, फापटपसारा नाही, आणि पुढे काय होणार हे माहीत असूनही खुर्चीत खिळवून ठेवायची खुबी जमल्यामुळे ह्या चित्रपटावर खर्च केलेले पैसे वसूल होतात.
लहानग्यांना आवडेल. मोठ्यांतल्या लहानग्यांना सुद्धा....
वेळ मिळाल्यास नक्की बघा... !! चित्रपटाचे गुणांकन ४/५ करायला हरकत नाही.
--आशुतोष दीक्षित.
मला वाटतं की लहान थोरांपासून ज्यांना बोलता वाचता येत असा एकही माणूस नसेल ज्याला 'रामायण' माहीत नाही. तोच तोच विषय पुन्हा पुन्हा येऊन देखील आणि त्यावर अनेक चित्रपट/सिरियल्स बनवल्या जाऊन देखील चेतन देसाई ने हवा तसा परिणाम साधला आहे. !
संगीत दिलखेचक नसले तरीही त्याचा योग्य वापर करण्यात यश आले आहे, ऍनिमेशन सुपर्ब आहे, मी स्वतः जवळ जवळ ४ ऍनिमेटेड रामायण पाहिले आहेत -- त्यातले सर्वात सुंदर - "रामायण- द लिजेंड ऑफ प्रिन्स राम" च्या तुलनेत आजचा सिनेमा थोडा कमी पडतो, अर्थात रावणासाठी अमरिश पुरी ने दिलेला तो आवाज अजरामर आहे --- त्याच्या जवळपास सुद्धा आशुतोष राणा पोचू शकला नाही हे खरे... ! परंतु भारतीय ऍनिमेशन चे प्रयत्न नक्कीच वाखाणण्यांजोगे आहेत !!
चित्रपटाचे कथानक वेगळे काय सांगू ? सर्वांना माहीतच आहे परंतु काही बाबी आवडल्या त्या आवर्जून सांगाव्या वाटत आहेत -
१) राम वनवासात जाताना दशरथाची दुर्दैवी अवस्था उत्तम मांडली आहे -- (त्यातच ह्या 'अयोध्या खटल्या'च्या पार्श्वभूमीवर)--दशरथाचा --> "राम... मत जाओ राम.. . ये राजपाठ तुम्हारा अपना है... अयोध्या तुम्हारी है राम... मत जाओ" हा डायलॉग ला आपसूक मनात अभिमान निर्माण होतो.
२) ऊर्मिला राजवाड्याच्या सौंधातून लक्ष्मण/राम/सीतेला निरोप देते तेव्हा तिच्या डोळ्यातला अश्रू, आणि त्याच अश्रूंचा पुढे नाव वल्हवतानाचा उडालेला थेंब - ह्या ऍनिमेशन ला १०० मार्क्स !!
३) रामाचा वनप्रवास अयोध्या ते दंडाकारण्य, पंचवटी, सीतेचा शोध घेण्याचे रस्ते ही मार्गक्रमणीका मॅप च्या साह्याने उत्तम दाखवली आहे.
४) सगळीकडून रावणाचे दूत पक्षांमार्फत खलिता पाठवून संपर्कात असतात- तो खलिता पक्षी कॅच करतो.. तोंडात पकडतो ते ऍनिमेशन मस्त आहे
५) हनुमान प्रचंड (अगदी HUGE) पीळदार दाखवला आहे --बघूनच आपोआप मनोमन हात जोडले जातात.
६) माकडांचे गाणे 'हम से है खुशियाँ' मस्त आहे-- लहान मुलांना आवडेल नक्कीच !!
७) रावणाच्या राजसभेत प्रत्येक आसनावर रावणाचे अंतर्मन (इथे ट्रिक पक्की जमलीये.. ) त्याला सूचना/सला देताना पाहून भारी वाटतं !! आणि प्रत्येक वेळी रावण सभेत "हम....-- राक्षस है" !! ची आरोळी देऊन जोष वाढवत असतो !!
८) सर्वांत अंतिम युद्धामध्ये जेव्हा रावण युध्धभूमीवर येतो आणि मंत्रोच्चार करत स्वतःचे एकाचे हजार - दश हजार - शत हजार प्रती रावण (थोडक्यात CLONE )बनवून हल्ले करतो ते खूप आवडले.. !
9) सीता स्वयंवरामध्ये रामाचे उपरणे हात वर नेला कि खाली घरंगळते तो इफेक्ट जबरदस्त जमलाय....
मुद्देसूद उत्तम बांधणी, फापटपसारा नाही, आणि पुढे काय होणार हे माहीत असूनही खुर्चीत खिळवून ठेवायची खुबी जमल्यामुळे ह्या चित्रपटावर खर्च केलेले पैसे वसूल होतात.
लहानग्यांना आवडेल. मोठ्यांतल्या लहानग्यांना सुद्धा....
वेळ मिळाल्यास नक्की बघा... !! चित्रपटाचे गुणांकन ४/५ करायला हरकत नाही.
--आशुतोष दीक्षित.
Subscribe to:
Posts (Atom)