Monday, May 27, 2019

चित्रपट परीक्षण - PM MODI



१९८५ नंतर जन्मलेल्या पिढीने नरेंद्र दामोदरदास मोदींच्या रूपाने उत्तम बोलणारा पंतप्रधान पहिल्यांदाच अनुभवला...!


PM MODI हा सिनेमा तुम्हाला मोदी कसे घडत गेले हे दाखवतो.








जमेच्या बाजू-

१  मोदींचे सुरुवातीचे जीवन अत्यंत वेगाने दाखवले आहे, त्यामुळे सिनेमा रटाळ होत नाही

२   मोदी ह्या एका नावामागे किती लोकांचे परिश्रम दडलेले आहेत ते सार्थपणे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अर्थातच लीडर चांगला हवाच पण टीम देखिल चांगली पाहिजे हे लक्षात येते.

३  आणीबाणीची परिस्थिती, दंगे धोपे दाखवताना त्याचा जेवढा परिणाम झाला पाहिजे तेवढेच दाखवले गेले आहे,

कुठेही रक्तपाताची किळस येत नाही किंवा अतिरंजित दाखवल्यासारखे वाटत नाही.

४  अगतिकतेतून होणारा मनस्ताप आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी केलेले प्रयत्न विवेक ओबेरॉय ला बऱ्यापैकी दाखवता आलेले आहेत.

५  सिनेमॅटोग्राफी आणि हिमाचल मधले देखावे खूपच सुंदर आहेत.

६  हा सिनेमा समजा पूर्वनियोजित ११ एप्रिल ला प्रकाशित झाला असता तर आज किमान अजून १०-१५ सिट वाढली असती हे नक्की



पडत्या बाजू-

१ - हा एक जीवनपट आहे आणि ज्या व्यक्तीवर हा बेतलेला आहे ती व्यक्ती आपल्या समोर २४ तास आहे, वेग वेगळ्या माध्यमांतून आपण रोज त्यांना भेटतो त्यामुळे - "तुलना" हि अटळ आहे ! ह्या एकाच वस्तुस्थितीमुळे माझा पहिला पडता मुद्दा हा आहे की सिनेमा हा, सिनेमा वाटतो.

टीव्हीवर जीवनपट किंवा नाट्यरूपंतर पाहतो तसा.

२- ह्या व्यतिरिक्त मला तरी काही खटकले नाही.



चित्रपट परीक्षण थोडक्यात :-


चित्रपट सुरू होतो तोच "मोदी चहा" पासून, वडिलांना मदत करून शाळेत जाणारा मुलगा - रेल्वे थांबून लोकं यायची वाट न बघता चहा घेऊन आत जाणारा, लोकांशी बोलणारा, ऐकणारा, समजून घेणारा. युद्धाच्या घोषणेनंतर रेल्वे ने जाणाऱ्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चहा देऊन पैसे नाकारणारा आणि सलाम करून भारत माता की जय ! अशी खणखणीत घोषणा देणारा बाल कलाकार हे पात्र चांगले रंगवतो !


तिरंगा पाहून सलाम करणारा मुलगा दुसऱ्या मुलाला समजवून सांगताना मस्त वाटते !! देशप्रेम हे उसने आणता येत नाही, त्यामुळेच जिवाची पर्वा न करता देशप्रेमाने सैन्यात भरती होणाऱ्या प्रत्येकाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.


रा‌.स्व.सं मध्ये जावे की सैनिक बनावे की साधू बनावे ह्या दोलायमान परिस्थितीत असणारा नरेंद्र, एका नाटकात हुंड्याविरोढी बोलतो, तेव्हा त्याला भेटणारे रा.स्व. सं चे वकिलबाबु. त्यांनी दिलेले १० पैसे ( कभी कभी किस्मत आजमा लेनी चाहिये )

मग गाईड चित्रपट पाहून हिमालयात स्वतःच्या शोधात निघालेला नरेंद्र, त्यामध्ये त्याला भेटणारे friend philosopher and guide आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश !!


रा.स्व. संघाचे काम खूप व्यापक आहे परंतु चित्रपटात ते जास्त दाखवणे शक्य नसल्याची कल्पना होतीच. जेवढे दाखवले आहे ते देखील सुंदर ! नितीन कार्येकर वकिलबाबू च्या भूमिकेत शोभतात !


> गर्व से कहों हम हिंदु है,

> एक भारत अखंड भारत - सर्व धर्म एकता यात्रा

> काश्मीर लाल चौकात तिरंगा फडकवणे,
(इथेच सैनिकांशी बोलतानाचा डायलॉग आहे --; देश के लिये जान हाजिर है, पर ये पॉलिटिशिअन्स की वजह से हमारे लोग शहिद होते है, हम कुछ कर नही पाते. - जिस दिन साहब हमारी सरकार ने हमारे हाथ खोल दिये ना... अंदर घुस के मारेंगे ! आणि सत्ता आल्यावर पहिल्यांदा जे काम केले ते म्हणजे आर्मी ला मोकळीक दिली दहशतवाद हटवण्यासाठी हे आपल्या लगेच लक्षात येत.. आणि इथपासून सुरू होतात त्या लोकांच्या टाळ्या)


RSS to BJP to INDIA ह्या Transformation मध्ये आवश्यक असलेले हे सगळे प्रसंग अत्यंत चांगल्या आणि सकारात्मक पद्धतीने दाखवलेआहेत.


एक एक युक्त्या करून राजकारणात जम बसवणे, लोकांना आपल्या बाजूने करून घेणे उत्तम दाखवले आहे - ह्या सगळ्ञासाठी तरी एकदा सिनेमा पाहायला हवा, जय-विरू, सेहवाग-सचिन आणि ह्यांच्यासारखीच सुपरहिट मोदी-शहा जोडी कशी बनते ते पडद्यावर पाहायला छान वाटते.


गोध्रा हत्याकांड, अक्षरधाम हमला, हे सगळे प्लॅन कुठून कसे केले गेले असावेत, एका राज्याला कोंडीत कसे पकडले जाते आणि त्यातून फक्त लोकांच्या विश्वासावर ते राज्य पुन्हा उभे राहते, ताठ मानेने Vibrant Gujraath समिट घेते, देश विदेशातील लोकांना त्यांचे डेव्हलपमेंट मॉडेल मान्य करावे लागते , आणि हे केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि जनतेच्या प्रतिसादाच्या जोरावर हे पाहून प्रत्येक राज्य असे उन्नत का होऊ शकत नाही असा साहजिक प्रश्न मनात येतोच !!


सिनेमातले काही काही डायलॉग आठवणीत राहतात उ. दा. - टाटांसोबतच्या कराराच्या वेळी, "वो क्या है ना सर, जो फैसाला एक मिनिट मे नहीं होता.. वो कभी नही होता !! "

बोमन इराणी ने रतन टाटा उत्तम रंगवले आहेत, ते पाहताना पुन्हा एकदा माझ्यातले "टाटा" प्रेम उफाळून आले...ONCE a TATA ... always a TATA - मी भाग्यवान समजतो की सुरुवातीच्या काळात मी टाटा कंपनीत काम केले जिथे नीतिमूल्य शिकवली गेली जी आजही कामी येत आहेत.


फकिरा, जख्म अभी है निले, देश नही झुकने दुंगा गाणी उत्तम !

शेवटची रॅली मध्ये अतिरेकी हमला होणार हे माहीत असताना केलेले तपास, पाठपुरावे अत्यंत उत्कंठावर्धक आहेत... १००% मार्क त्या ३० मिनिटांच्या शॉट ला ! काय होणार माहीत असूनही आपण जागेवर खिळून बसतो.


-

माझ्याकडून सिनेमा ला ५ पैकी ४ मार्क्स. - सगळ्या होऊ घातलेल्या टीम लीडर जमातीने पाहावा असा सिनेमा !

Saturday, July 22, 2017

"क्लब-३३" - अर्थात तिसरे तप संपायला ३ कमी !!


२०१६ मध्ये ठरवल्याप्रमाणे, न ठरवताच समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरा गेलो  आणि असे लक्षात आले की आजवर प्लॅन करून घडलेल्या गोष्टी आणि ह्या अचानक समोर आलेल्या अगदी कमी तयारी असताना केलेल्या गोष्टींच्या रिझल्ट्स मध्ये खूप काही फरक नाहीये... ! In Fac, अचानक आलेल्या गोष्टी जास्त कार्यक्षमतेने handle केल्या गेल्या आहेत !!

बऱ्याचं दिवसांपासूनची Pending कामे मार्गी लागली..... USA ची ट्रीप झाली, तिकडच्या लोकांनी प्रशंसा केल्यानंतर इथे देखिल कंपनीतील एक महत्त्वाचे  award जाहीर झाले...Promotion(अर्थात फक्त रोल बदलला).... एकंदरीत काय तर Professionally अच्छे दिन ची सुरुवात झाली असे म्हणू शकतो.

मागच्या वर्षीप्रमाणेच बरेच नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले - जगन्मित्र ह्या स्वभाववैशिष्ठ्यामुळे दरवर्षी मित्रांची संख्या वाढतच जात आहे...:)  

२०१७ ला साधारण ४ महिने "फेसबूक" बंद केल्यामुळे विविध प्रश्न येत होते, की हे काय नवीन ?, उगीच काहितरी करत असतो, फुकट नाटकं वगैरे वगैरे.. पण त्याचे खरे कारण म्हणजे, ७७.४ किलो वजन आणि ग्रुप फोटो मध्ये आपला झालेला विस्तार! आता ह्या गोष्टीची परस्पर लिंक कशी काय ?

तर, मला public interaction ची खूप आवड आहे, आणि मी प्रचंड प्रसिद्धीलोलुप माणूस आहे, मला कायम लाइमलाइट/चर्चेत राहायला आवडते (राखी सारखे नव्हे बरं का ! ) अर्थात चांगल्या गोष्टींसाठी !!.
आजकाल निम्मी जनता फक्त फेसबुकवरच भेटते......उदाहरणार्थ शेजारच्या गल्लीत राहणारा माझा मित्र कायम नाइट शिफ्ट करतो... आणि आमचे weekoff पण वेगवेगळे, त्यामुळे ५०० मीटर अंतरावर असून आमचे भेटणे जास्त होत... { उगीच सल्ले देऊ नका की एकदा फोन करून भेटायचा, १५ ऑगस्ट, जानेवारी २६ ला तरी भेटायचं वगैरे, आम्ही दोघं २४*७ मध्ये आहोत आणि शक्य ते सगळे  Options Try करून झालेत... )

असो, मुद्दा हा की फेसबुक वर सगळे लोकं वेळा-काळाचे बंधन न बाळगता भेटू शकतात... ! समजा मी फेसबुक बंद केले तर माझे मन मला खात राहिलं, की एवढे दिवस तू ह्या मित्रांशी बोलला भेटला नाहीसं, जगात कोण काय करत आहे ते बाकी सगळ्ञांना समजत आहे केवळ मलाच नाही ! मी काय करतो हे मला माहीत आहेच पण ते लोकांना कळावे हे देखिल महत्त्वाचे असते ते होणार नाही...  Online Contests मधून नवीन बक्षिसे  जिंकता येणार नाहीत !! म्हणजे किती हे नुकसान !!

मग ठरवले,  वजन कमी करून एकदम फिट-&-फाइन होईस्तोवर फेसबुक बंद ठेवायचे ! ६४ - ६८ हा टार्गेट टॅग माझ्या आरशावर लावून ठेवला !! रोज सकाळी उठल्यावर हा टॅग दिसायचा.... !! दर एक आठवड्याने वजन करायचो. बरेच दिवस पाहीन पाहीन म्हणत बाकी ठेवलेले भाग मिल्खा भाग पाहिला आणि मी खुपच Motivate झालो ! मार्च २०१७ मध्ये ७७.४ किलो वजन असताना रोज ४-५ किलोमीटर चे जॉगिंग, आहारावर प्रचंड नियंत्रण ( पाव नाही ! मैदा नाही ! स्वीटस नाही ! बेकरी पदार्थ नाही ! ) सुरुवातीचा महिनाभर रोज ५०० दोरीच्या उड्या आणि जून पर्यंत वाढवून १००० दोरीच्या उड्या प्रत्येक दिवशी ! ऊन-पाऊस-थंडी ची फिकीर न बाळगता माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त एकच टार्गेट होते ! आपल्या देशात गुरू ला खूप महत्त्व आहे - कोणालातरी गुरू मानणे ह्याशिवाय सफलता मिळू शकत नाही हे तर निश्चित !
त्यामुळे माझ्या मित्रमंडळींच्या कंपू मध्ये मला motivation मिळाले आणि "गुरु"  देखिल ! (गुरुजी) -- त्यांचे विशेष आभार !

६८.४ चे टार्गेट ३ महिन्यात पुर्ण करून १५ जून २०१७ - मध्ये फेसबुकवर परतलो... !! आता मुख्य काम आहे Maintenance चे !
२०१७ ते २०१८ --> स्वतःच्या २ फोटोमधला चांगला फरक ठळक दिसेल हे पाहायचे !

वेताळ पंचविशी मधली ७ वी पायरी चढून झाले....मागच्या प्लॅन च्या success rate नुसार मागील पानावरून पुढे सुरू ठेवणे जास्त लाभदायक आहे ! त्यामुळे वेगळे काहीही लिस्ट न बनवता जो होगा देखा जायेगा.....कधी समजा ताकद कमी पडलीच तर म्रुत्युंजय मंदिर आहेच जवळ !!

ॐ नम: शिवाय !!