डुक्कर !!
हा शब्द बाहेर पडला की काय आठवतं ?
गावाबाहेरचा उकिरडा ? - शहरातली तुडुंब वाहणारी कचरापेटी ? - डझनभर पिले आणि त्यांच्या आईसोबतची वरात ? - वराह अवतार? - शोले मधला गब्बर ? म्युन्सिपल्टी वाल्यांची धावपळ?- --- काय काय नाही आठवतं ... पण मला सर्वात आधी काही डोक्यात येत असेल तर ते म्हणजे - एक विशेषण (मूर्ख/नालायक/त्रासदायक/तापदायक व्यक्तीचे !)
हा लेख लिहिण्याचा विचार मनात आला तोदेखील ह्याच स्पेशल कारणामुळे ! डुक्कर हा शब्द किती सहजपणे वापरला जातो ना? ---
कंपनीत आपल्या टीम मधल्या माणसांपैकी कोणी ऑनसाईट जाऊन आला आणि त्याने चॉकलेट्स आणून डेस्क वर ठेवली की ती घेण्यासाठी झुंबड उडते.. त्यात शेवटच्या माणसाला अगदी चवीपुरते एक'च चॉकलेट मिळते तेव्हा तो/ती म्हणते - कसले डुक्कर आहात यार तुम्ही.. ! :)
आजकालच्या कॉर्पोरेट जगात ५ दिवस काम केल्यावर २ दिवस मिळणाऱ्या सुट्टीमध्ये त्या पाच दिवसांचे कपडे धुणे, रूम आवरणे, घरची कामे, बाहेरची कामे करून काही तास शिल्लक राहतात, त्यामध्ये समजा आपण दुपारी किंवा सकाळीच टी. व्ही पाहत लोळत पडले असू तर घरातून हमखास एक आवाज येतो - "अरे डुकरासारखा लोळतोयस नुसता...ऊठ जरा काही अजून कामं कर... !
एवढेच काय, रमेश सिप्पींच्चा ब्लॉकबस्टर शोले आठवतोय का ? त्यामधले गब्बरसिंगदेखील आपल्या पराभूत गुंडांना म्हणतो - "सुवर के बच्चों" !! (आता मला सांगा हे असले राकट, दांडगट गुंड 'डुकराच्या' पिलांची उपमा घेण्याच्या लायकीचे आहेत का ? --- डुकराचे पिलू तर किती क्युट असते.. (असे माझे नाही आमच्या कॉलेजमधल्या स्नेहाचे मत होते !) )
वराह अवतारात विष्णूने देखील डुकराचे रूप घेतलेले आहे, त्याबाबतची आख्यायिका आणि कारणीमिमांसा सर्वश्रुत आहेच, मध्यंतरी पोगो वर दशावतार हा अनिमेटेड चित्रपट पाहताना विष्णूच्या सर्वचं रूपांचे दर्शन झाले आणि हात आपोआप जोडले गेले...
एकंदरीतच लहानपणापासून ज्या प्राण्याची किळस वाटते.. पाल, सरडा, अळी, झुरळ, इ. अश्या प्राण्यांपैकी फक्त डुकराचे नाव एकमेकांना उपाधी म्हणून दिले जाते... कोणी असे म्हणताना पाहिले नाही की "अरे झुरळा, नीट चाल..." पण "अरे ए डुक्कर" हे वाक्य अनेकदा हमखास ऐकायला मिळते... !!
एवढेच काय, लायनकिंग च्या "हकुना-मटाटा" मध्ये टिमोन आणि पुम्बा असतात-- तो पुम्बा म्हणजे सुद्धा एक डुक्करच बरं का ! फरक फक्त एवढाच की ते रानडुक्कर होत... ! पण ह्या रानडुकराने लहान थोरांचे एवढे छान मनोरंजन केले की बाबा सहगल आणि अनाय्डा यांनी मिळून ह्या गाण्याचे हिंदी व्हर्जनदेखील काढले-- त्यामध्ये तर डुकराचे जीवनगान'च आहे ==" हकुना मटाटा -- फिकर ना करो... हमेशा खूश रहो !!"
मध्यंतरी तर 'स्वाईन फ्लु' मुळे डुक्कर हा प्राणी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता....तोंडाला मास्क लावून फिरणाऱ्या माणसांनी मास्क विक्रेत्यांचा चांगला धंदा करून दिला...मी तर असेही ऐकले होते की एक मास्क विक्रेत्याने एका दिवसात २००० रुपयांची मास्क विक्री झाल्याच्या आनंदात कचराडेपोजवळ फिरणाऱ्या डुकरांना चितळ्यांचे अर्धा किलो श्रीखंडाचा डबा ठेवला होता म्हणे... (खी खी खी..)
डुक्कर पकडायला आलेल्या कॉर्पोरेशन च्या लोकांच्या टीम ला पाहिले आहे का ? नुसता दंगा असतो डुक्कर पकडताना, एरवी गप्प गार पडलेले डुक्कर ह्या वेळी भलतीच चपळाई दाखवते.. लाइव्ह एंटरटेनमेंट असते ह्या वेळी... जमल्यास बघा कधीतरी !!
लहानपणी च्युंइंग-गम डुकराच्या चरबीपासून बनवतात हे ऐकून च्युंइंग-गम खाणे सोडले होते, फिरंगी लोक तर डुकरे पाळतात म्हणे, पांढरीशुभ्र, गुलाबी, आणि करड्या रंगांची.... आणि पोर्क पोर्क म्हणत त्यांच्या मांसावर ताव पण मारतात...! तिकडे डुकरांची शेती(पालन) करणारा झटपट धनवान होतो म्हणतात.. सुदैवाने आपल्याकडे अजून तरी हे फॅड आलेले नाही...
डुक्कर हा काही कोणाचा आवडता प्राणी होऊ शकत नाही कबूल... पण ह्या प्राण्याइतके स्वच्छंदी आयुष्य दुसऱ्या कोणाप्राण्याच्या नशिबी आल्याचे दिसत नाही...रानडुकराची ताकद तर सर्वांना माहीत आहेच, त्यामुळे ह्या प्राण्याकडून थोडेफार काही घेण्यासारखे असेल तर तो मस्तवालपणा ! डुकराला कोणी घाण्याला जुंपत नाही, त्याच्यावरून ओझी वाहत नाहीत, डुकराचा रपेटीसाठी वापर शून्य...हे नुसते इथून तिथे भटकत असते, जोडीला आपला प्रपंचगाडा घेऊन दोनाचे चार चाराचे आठ ह्या दराने वाढवत बिचारे ओला कचरा, सुका कचरा - जिथे जाते तिथे खाते....
असो, कोणाच्या खाण्यावर बोलू नये, म्हणून लेख इथेच संपवतो...
(बराच वेळ जमिनीला पाठ टेकली नाही...त्यामुळे आता जरा लोळावे म्हणतो.. मस्त, स्वच्छंदी, बेफिकीर........अगदी डुकरासारखे :) )
-
आशुतोष दीक्षित.
इथून तिथून जे जे वाचतो/पाहतो,
त्या सगळीकडून प्रेरणा घेउन काही बाही लिहायची सवय लागून गेली होती....
ते सगळे वैचारिक धन (निदान स्वतःच्या दृष्टीने) एकत्र एका जागी राहावे म्हणून हा प्रयत्न..
येथे येणाऱ्या 'कट्टा' मेंबरनी
दिलासा/उमेद/मस्करी/थट्टा/ एकंदरितच ह्या जगण्यच्या धावपळीत एकमेकांना प्रसन्न होण्याचा/हसण्याचा मौका घ्यायचा आणि द्यायचा....चलनी नोटांचे काम नाही,फक्त दिल से दिल का रिश्ता...
Wednesday, March 21, 2012
Wednesday, February 29, 2012
रविवारची कहाणी !!
:)२४*७ कार्यप्रणाली मध्ये रविवारचा निवांतपणा नेहमी नशिबात नसतो, पण आज सुट्टी होती त्यामुळे संध्याकाळी डेक्कन आणि JM,FC वर टाईमपास करून आल्यावर घरी जाण्याआधी काट्यावर गेलो... निशांत आणि सौरभ ची नेहमीसारखीच एकमेकांवर शाब्दिक कुरघोडी सुरू होती... बाकीचे एन्जॉय करत होते, निशांत ने कसलातरी पण केला होत नवीन वर्षाचे निमित्त साधून, त्यावर सौरभ म्हणाला - अरे नळीत घातली तरी कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! थोडासा हशा झाला...:)
मी त्यात सामील झालो.. तेवढ्यात विशाल मागून पुढे येत म्हणाला - अरे नवीन सुचलंय...!! -- जरी शेपूट सरळ झाली... तरी कुत्रा तो कुत्रा'चं!! :P :P त्यावर सौरभ निशांतसहीत आम्हा सगळ्यांचे तुफान हास्य! आणि हे ऐकून चटकन माझ्या तोंडून निघून गेले -- अरे वा विश्या, साल्या तू मला माझ्या फेसबुक चे पुढचे स्टेटस दिलेस :-) आता रात्रीच अपडेट करतो आणि उद्या शेकडो "लाइक्स" आणि "कमेंट्स" खेचतो!!
""
घरी आलो, आज रात्री भाकरीचा प्लॅन होता, अनेक दिवसांनी सगळ्या कुटुंबीयासोबत गरम गरम भाकरीचा आस्वाद घेतला - "वाह लाईफ हो तो ऐसी.... मनात आले आणि लगेच मोबाईल वरून हेच वाक्य फेसबुकवर टाकले. :) जेमतेम अर्धा तास झाला नसेल, तोवर १०-१२ लोकांच्या प्रतिसादाने माझी वॉल भरून गेली... का रे काय झालं? लॉटरी लागली का? काहीतरी फालतू असेल! कोण कोण? असे अनेक प्रतिसाद, आणि तेवढेच लाईक्स!
" "
कोणे एके काळी मी स्वतः फेसबुकच्या विरोधात होतो, फक्त ऑर्कुट ही सोशल नेटवर्किंग साईट वापरत होतो - मुख्य कारण म्हणजे कसे वापरावे ते माहीत नाही, आणि दुसरे म्हणजे "ऑर्क्युट च्या कंफर्ट झोन" मधून बाहेर पडावेसे वाटत नव्हते! आणि शिकण्यासाठी वेळ घालवणे -- सोडून बोला!!
(मी तर शैक्षणिक इयत्तांमध्येही एखादी गोष्ट खास वेळ देऊन शिकल्याचे आठवणीत नाही)
पण एकदा दिवसभर काहीच काम नव्हते, मग एका मित्राच्या नादाने अकाउंट उघडलं - दिवसभर वेगवेगळे फंडे शिकवले, आणि घरी जाईपर्यंत मी एक्स्पर्ट झालो होतो.... त्याने मला सांगितले की ह्या मायाजालाचा उपयोग - फक्त लक्षवेधी पणा करणे आणि जमलंच तर जुन्या मित्रांच्या संपर्कात राहणे! एवढाच....
फक्त माझ्याबाबत नाही! हीच कहाणी अनेकांच्या बाबतीत कदाचित खरी असेल, आपल्या सभोवताली वावरणाऱ्या अनेकांच्या बाबतीत आता मात्र अतिरेक झालाय, असे वाटायला लागले आहे - कशाला हा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायची चढाओढ? कशाला ते सारखे अपडेटस, लाइक्स?
सगळ्या गोष्टी तर आपण इथे 'अपडेट' म्हणून टाकून मोकळे होतो..... स्वतःची प्रायव्हेट लाईफ काही उरलीच नाहीये का? कबूल की काय टाकायचे आणि काय नाही ते आपल्या हातात असते, पण एखाद्या गोष्टीची सवय लागली की अनवधानाने त्या आपोआप घडतात -- परीस शोधायला निघालेला तो माणूस आठवतोय का? सगळे चिलखत सोन्याचे झाले तरी दगड उचलतो, अंगावर लावतो आणि यांत्रिकपणे पुढे जातो....
रोजच्या पेपर मध्ये येणारे सोशल-नेटवर्किंगच्या माध्यमांतून झालेले फसवणुकीचे, लोकांचे जॉब गेल्याचे, किंवा बदनामीचे लेख आपण चवीचवीने वाचतो, पण त्याचा काहीच परिणाम दिसत नाही. - परवाच पेपर मध्ये वाचले की एका अपलोड केलेल्या फोटोवरून सुद्धा सगळी माहिती मिळवता येते... (अर्थात हॅकर ला! )
खूप जुने जुने मित्र, जे शाळेत सोबत होते, परंतु ह्या उभ्या आयुष्यात त्यांना कधीही भेटणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे शक्य नव्हते असे लोक मला इथेच सोशल नेटवर्किंग साईट वर सापडले, रोज संगणक चालू केला की चॅट ला कोणीही असो, उत्तर ठरलेले -- अरे जरा फेसबुक चेक करतोय...!
संगणकासमोरचा ७०% वेळ ह्याच भानगडीत जातो! आणि मग कामं बाजूला राहतात काही काही जणांची... किंवा बऱ्याच जणांची... आता ते लोक वेळ कसे सांभाळून नेतात हे सुज्ञास सांगणे न लागे! -
"अज्ञानात सुख असते" हि टॅगलाईन आज पटली.... तीच माझा ह्या सोशल नेटवर्किंगवर शेवटचा अपडेट! -Good Bye FB -अगदीच काही साधन नसेल आणि जुन्या मित्रांची आठवण आली तर परत येईन -- परंतु रतीब मात्र विसरा आता.... आमचा सोशल नेटवर्किंगला - सन्मानाने जय महाराष्ट्र ! !
मी माझ्यापुरते तरी ठरवले आहे... की आता हे अती झाले आहे, आणि माती होण्याअगोदरच.... आपल्या आयुष्याला परत एकदा तेवढेच (प्रायव्हेट) खासगी बनवायचे!
रविवारची निम्मी रात्र हा लेख लिहिण्यात गेली.... पण मी सोमवारपासून बराच वेळ इतर कामांसाठी देऊ शकेन ह्याची खात्री आहे!
-
आशुतोष दीक्षित.
मी त्यात सामील झालो.. तेवढ्यात विशाल मागून पुढे येत म्हणाला - अरे नवीन सुचलंय...!! -- जरी शेपूट सरळ झाली... तरी कुत्रा तो कुत्रा'चं!! :P :P त्यावर सौरभ निशांतसहीत आम्हा सगळ्यांचे तुफान हास्य! आणि हे ऐकून चटकन माझ्या तोंडून निघून गेले -- अरे वा विश्या, साल्या तू मला माझ्या फेसबुक चे पुढचे स्टेटस दिलेस :-) आता रात्रीच अपडेट करतो आणि उद्या शेकडो "लाइक्स" आणि "कमेंट्स" खेचतो!!
""
घरी आलो, आज रात्री भाकरीचा प्लॅन होता, अनेक दिवसांनी सगळ्या कुटुंबीयासोबत गरम गरम भाकरीचा आस्वाद घेतला - "वाह लाईफ हो तो ऐसी.... मनात आले आणि लगेच मोबाईल वरून हेच वाक्य फेसबुकवर टाकले. :) जेमतेम अर्धा तास झाला नसेल, तोवर १०-१२ लोकांच्या प्रतिसादाने माझी वॉल भरून गेली... का रे काय झालं? लॉटरी लागली का? काहीतरी फालतू असेल! कोण कोण? असे अनेक प्रतिसाद, आणि तेवढेच लाईक्स!
" "
कोणे एके काळी मी स्वतः फेसबुकच्या विरोधात होतो, फक्त ऑर्कुट ही सोशल नेटवर्किंग साईट वापरत होतो - मुख्य कारण म्हणजे कसे वापरावे ते माहीत नाही, आणि दुसरे म्हणजे "ऑर्क्युट च्या कंफर्ट झोन" मधून बाहेर पडावेसे वाटत नव्हते! आणि शिकण्यासाठी वेळ घालवणे -- सोडून बोला!!
(मी तर शैक्षणिक इयत्तांमध्येही एखादी गोष्ट खास वेळ देऊन शिकल्याचे आठवणीत नाही)
पण एकदा दिवसभर काहीच काम नव्हते, मग एका मित्राच्या नादाने अकाउंट उघडलं - दिवसभर वेगवेगळे फंडे शिकवले, आणि घरी जाईपर्यंत मी एक्स्पर्ट झालो होतो.... त्याने मला सांगितले की ह्या मायाजालाचा उपयोग - फक्त लक्षवेधी पणा करणे आणि जमलंच तर जुन्या मित्रांच्या संपर्कात राहणे! एवढाच....
फक्त माझ्याबाबत नाही! हीच कहाणी अनेकांच्या बाबतीत कदाचित खरी असेल, आपल्या सभोवताली वावरणाऱ्या अनेकांच्या बाबतीत आता मात्र अतिरेक झालाय, असे वाटायला लागले आहे - कशाला हा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायची चढाओढ? कशाला ते सारखे अपडेटस, लाइक्स?
सगळ्या गोष्टी तर आपण इथे 'अपडेट' म्हणून टाकून मोकळे होतो..... स्वतःची प्रायव्हेट लाईफ काही उरलीच नाहीये का? कबूल की काय टाकायचे आणि काय नाही ते आपल्या हातात असते, पण एखाद्या गोष्टीची सवय लागली की अनवधानाने त्या आपोआप घडतात -- परीस शोधायला निघालेला तो माणूस आठवतोय का? सगळे चिलखत सोन्याचे झाले तरी दगड उचलतो, अंगावर लावतो आणि यांत्रिकपणे पुढे जातो....
रोजच्या पेपर मध्ये येणारे सोशल-नेटवर्किंगच्या माध्यमांतून झालेले फसवणुकीचे, लोकांचे जॉब गेल्याचे, किंवा बदनामीचे लेख आपण चवीचवीने वाचतो, पण त्याचा काहीच परिणाम दिसत नाही. - परवाच पेपर मध्ये वाचले की एका अपलोड केलेल्या फोटोवरून सुद्धा सगळी माहिती मिळवता येते... (अर्थात हॅकर ला! )
खूप जुने जुने मित्र, जे शाळेत सोबत होते, परंतु ह्या उभ्या आयुष्यात त्यांना कधीही भेटणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे शक्य नव्हते असे लोक मला इथेच सोशल नेटवर्किंग साईट वर सापडले, रोज संगणक चालू केला की चॅट ला कोणीही असो, उत्तर ठरलेले -- अरे जरा फेसबुक चेक करतोय...!
संगणकासमोरचा ७०% वेळ ह्याच भानगडीत जातो! आणि मग कामं बाजूला राहतात काही काही जणांची... किंवा बऱ्याच जणांची... आता ते लोक वेळ कसे सांभाळून नेतात हे सुज्ञास सांगणे न लागे! -
"अज्ञानात सुख असते" हि टॅगलाईन आज पटली.... तीच माझा ह्या सोशल नेटवर्किंगवर शेवटचा अपडेट! -Good Bye FB -अगदीच काही साधन नसेल आणि जुन्या मित्रांची आठवण आली तर परत येईन -- परंतु रतीब मात्र विसरा आता.... आमचा सोशल नेटवर्किंगला - सन्मानाने जय महाराष्ट्र ! !
मी माझ्यापुरते तरी ठरवले आहे... की आता हे अती झाले आहे, आणि माती होण्याअगोदरच.... आपल्या आयुष्याला परत एकदा तेवढेच (प्रायव्हेट) खासगी बनवायचे!
रविवारची निम्मी रात्र हा लेख लिहिण्यात गेली.... पण मी सोमवारपासून बराच वेळ इतर कामांसाठी देऊ शकेन ह्याची खात्री आहे!
-
आशुतोष दीक्षित.
Subscribe to:
Posts (Atom)

