~~~~
My OLD Article after getting engaged on 07 DEC 2011 :)- This was earlier published on MomentVille (WEDSITE)
~~~~~
"माझे लग्न ठरताना...." असा एक लेखच' लिहिणार होतो, पण म्हटलं उगीच एवढे मी'पण बरे नव्हे.
तर माझे लग्न कसे कधी कुठे आणि केव्हा ठरले ह्याबद्दल उत्सुकता असणाऱ्या सर्वांना त्यांच्या curiosity बद्दल धन्यवाद !
बहुतेक सगळ्या Arranged Marriages चा महत्त्वाचा दुवा म्हणजे "विवाह मंडळ" - Mr.&Mrs. कानिटकरांचे 'अनुरूप' आमच्या मदतीला तत्पर राहिले.
लग्नासाठीची मानसिक,आर्थिक,नैतिक व नावनोंदणीची तयारी -- त्यानंतर प्रत्यक्ष विवाहमंडळात नाव नोंदणी -- पसंती-नापसंती --- आणि मग लग्न ! खूप भारी असतो बरं का हा सगळा प्रवास --- वाचताना वाटतो तेवढा साधा सरळ सोपा अजिबात नसतो !
अनेक लग्नाळलेल्या,In process, expecting bride, लोकांनी "लग्न आणि त्याबाबतच्या (भ्रामक)समजुती" ह्यावर कितीतरी मजेदार, किस्सेदार, खुमासदार (ज्यांनी स्वानुभव दिलेत त्यांच्या बाबतीत दिलदार देखिल) लेखन केले आहेच... आणि हाच साहित्यसाठा वाचत वाचत आम्ही लहानाचे मोठे झाले.... (येथे अर्थ वय २२ ते २७ )
कितीही पुढारलेले घराणे किंवा जमाना आला तरी योग्य वयात घरचे मोठे बहीण भाऊ, किंवा नातेवाईकांतील समंजस व्यक्ती आपल्याला एक कानमंत्र देतात'च तो म्हणजे " मैत्रिणी कोणत्याही चालतील, पण बायको शक्यतो "आपल्यातलीच" बघा !" आणि तो चुकीचा आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही, पण प्रत्येकाला स्वतःचे मत असते आणि त्याबाबत त्यानेच निर्णय घेणे योग्य.
असो, तर हा कानमंत्र तर पाचवीलाच पुजल्याने आम्ही प्रेमं बिमं करायच्या भानगडीत पडलोच नाही.... ! काही खट्याळ आणि खोड्याळ लोकं या वाक्यानंतर "जमलंच नसेल... " वगैरे बाष्कळ विनोद करू पाहतील पण त्यांना महत्त्व दिल्याने त्यांचा उपद्रव आणि आपल्याला त्यांची येणारी कीव दोन्ही वाढतं जात - म्हणून IGNORE & Proceed पद्धत मी आचरणात आणतो.
लग्नाच्या योग्य वयात (अजून तरी २६ ते २९) आल्यावर आम्ही आणि घरचे मिळून एका गहन चर्चेला बसलो - लग्न करायचे का ? कुठे काही प्रकरणं नाहीये ना आधीच ? नाव नोंदवूयात का ? वगैरे प्रश्नांवर गहन बोलणी होवून उद्या ठरवू ह्या स्वल्पविरामानंतर मग कॉफी किंवा डाळ तांदुळाच्या खिचडीने चर्चेची सांगता केली जाते.
एकदा नाव नोंदवले की मग फोन Enquiry सुरू होतात --आणि मग मुलगा असो वा मुलगी.... दोघांनाही गरम मसाला पिक्चरमध्ये अक्षय कुमारच्या ओळींचा प्रत्यय येतो..."जो हमे चाहिये उसे हम नाही चाहिये, और जिसे हम चाहिये वो किसको चाहिये ??"
ह्यानंतर मग सुरू होतो तो कांदेपोहे (आत्त्ताच्या generationचा चहा-कॉफीचा) प्रोग्रॅम... त्यातून समोरचा माणूस उलगडला तर ठीक नाहीतर मग - बोरींग,वाढीव,आगाऊ,मिजासखोर आणि अशी अनेक विशेषणं लावून Rejection चा ठप्पा लावून गुडबाय ! एवढं सगळं झाल्यानंतर मग मात्र एका ठिकाणी WaveLength जुळते ! मग घरच्यांचा बोलीचाली आणि मग शेवटी धूमधडाका - !
आमचं देखिल ALMOST सगळं असंच झालं -> अनुरूप मध्ये प्रोफाइल्स पाहिल्या, मग पहिली भेट, दुसरी भेट, Familly involvements, इंटरनेट वरून Chat connectivity आणि Final GO/NO-GO !!
शेवटी शाहरुख चे DDLJ मधले वाक्य खरे ठरले !! -"जो शादी वाले घर मे सेवा करता है, उसको बोहोत सुंदर बिवी मिलती है"- आजवर अनेक लग्नांमध्ये पु.लं.चा 'नारायण' Character निभावल्याचे उत्तम फळ मिळाले आहे -
माझ्या UnMarried दोस्तांनो, हा Funda Try करा - तुम्हाला देखील नक्कीच प्रत्यय येईल.....
ही आमची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण !!
तर माझे लग्न कसे कधी कुठे आणि केव्हा ठरले ह्याबद्दल उत्सुकता असणाऱ्या सर्वांना त्यांच्या curiosity बद्दल धन्यवाद !
बहुतेक सगळ्या Arranged Marriages चा महत्त्वाचा दुवा म्हणजे "विवाह मंडळ" - Mr.&Mrs. कानिटकरांचे 'अनुरूप' आमच्या मदतीला तत्पर राहिले.
लग्नासाठीची मानसिक,आर्थिक,नैतिक व नावनोंदणीची तयारी -- त्यानंतर प्रत्यक्ष विवाहमंडळात नाव नोंदणी -- पसंती-नापसंती --- आणि मग लग्न ! खूप भारी असतो बरं का हा सगळा प्रवास --- वाचताना वाटतो तेवढा साधा सरळ सोपा अजिबात नसतो !
अनेक लग्नाळलेल्या,In process, expecting bride, लोकांनी "लग्न आणि त्याबाबतच्या (भ्रामक)समजुती" ह्यावर कितीतरी मजेदार, किस्सेदार, खुमासदार (ज्यांनी स्वानुभव दिलेत त्यांच्या बाबतीत दिलदार देखिल) लेखन केले आहेच... आणि हाच साहित्यसाठा वाचत वाचत आम्ही लहानाचे मोठे झाले.... (येथे अर्थ वय २२ ते २७ )
कितीही पुढारलेले घराणे किंवा जमाना आला तरी योग्य वयात घरचे मोठे बहीण भाऊ, किंवा नातेवाईकांतील समंजस व्यक्ती आपल्याला एक कानमंत्र देतात'च तो म्हणजे " मैत्रिणी कोणत्याही चालतील, पण बायको शक्यतो "आपल्यातलीच" बघा !" आणि तो चुकीचा आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही, पण प्रत्येकाला स्वतःचे मत असते आणि त्याबाबत त्यानेच निर्णय घेणे योग्य.
असो, तर हा कानमंत्र तर पाचवीलाच पुजल्याने आम्ही प्रेमं बिमं करायच्या भानगडीत पडलोच नाही.... ! काही खट्याळ आणि खोड्याळ लोकं या वाक्यानंतर "जमलंच नसेल... " वगैरे बाष्कळ विनोद करू पाहतील पण त्यांना महत्त्व दिल्याने त्यांचा उपद्रव आणि आपल्याला त्यांची येणारी कीव दोन्ही वाढतं जात - म्हणून IGNORE & Proceed पद्धत मी आचरणात आणतो.
लग्नाच्या योग्य वयात (अजून तरी २६ ते २९) आल्यावर आम्ही आणि घरचे मिळून एका गहन चर्चेला बसलो - लग्न करायचे का ? कुठे काही प्रकरणं नाहीये ना आधीच ? नाव नोंदवूयात का ? वगैरे प्रश्नांवर गहन बोलणी होवून उद्या ठरवू ह्या स्वल्पविरामानंतर मग कॉफी किंवा डाळ तांदुळाच्या खिचडीने चर्चेची सांगता केली जाते.
एकदा नाव नोंदवले की मग फोन Enquiry सुरू होतात --आणि मग मुलगा असो वा मुलगी.... दोघांनाही गरम मसाला पिक्चरमध्ये अक्षय कुमारच्या ओळींचा प्रत्यय येतो..."जो हमे चाहिये उसे हम नाही चाहिये, और जिसे हम चाहिये वो किसको चाहिये ??"
ह्यानंतर मग सुरू होतो तो कांदेपोहे (आत्त्ताच्या generationचा चहा-कॉफीचा) प्रोग्रॅम... त्यातून समोरचा माणूस उलगडला तर ठीक नाहीतर मग - बोरींग,वाढीव,आगाऊ,मिजासखोर आणि अशी अनेक विशेषणं लावून Rejection चा ठप्पा लावून गुडबाय ! एवढं सगळं झाल्यानंतर मग मात्र एका ठिकाणी WaveLength जुळते ! मग घरच्यांचा बोलीचाली आणि मग शेवटी धूमधडाका - !
आमचं देखिल ALMOST सगळं असंच झालं -> अनुरूप मध्ये प्रोफाइल्स पाहिल्या, मग पहिली भेट, दुसरी भेट, Familly involvements, इंटरनेट वरून Chat connectivity आणि Final GO/NO-GO !!
शेवटी शाहरुख चे DDLJ मधले वाक्य खरे ठरले !! -"जो शादी वाले घर मे सेवा करता है, उसको बोहोत सुंदर बिवी मिलती है"- आजवर अनेक लग्नांमध्ये पु.लं.चा 'नारायण' Character निभावल्याचे उत्तम फळ मिळाले आहे -
माझ्या UnMarried दोस्तांनो, हा Funda Try करा - तुम्हाला देखील नक्कीच प्रत्यय येईल.....
ही आमची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण !!
waa dixit...kya lekh ahe..:)..
ReplyDelete