कोणत्याही नव्या "अनुभवाला" समोर जाताना प्रत्येक मनात एकमेव ईच्छा असते. तो अनुभव चांगला असावा. अपेक्षापुर्ती करणारा असावा.....आज वयाची २५ वर्षे पुर्ण करताना असे अनेक अनुभव घेतले.....बरेचसे चांगले.... उरलेले चांगले मानून घेतले ..प्रत्येक अनुभव भरपूर गोष्टी शिकवून जातो...हे शिक्षण एकदा झाले की आयुष्यभरासाठीच...!
२५ हे काही मागे वळून पहायचं वय नाही कबूल आहे पण, नक्की कोणत्या वयात मागे वळून पहायचं हे ज्याचं त्यानेच ठरवायचं नाही का ? -- आज अनेक दिवसानी स्वतःलाच पाठमोरा पहायची वेळ.. आरश्यात फक्त प्रतिबिंब दिसत नाही....त्याहून जास्त त्या चेहर्यामागे, प्रतिमेमागे ती उभ्या करणाऱ्या लोकांचे चेहेरे दिसले पाहिजेत... लोकं बुटांवरून ओळखली जातात असं म्हणतात... पण ते बुट ज्या जमिनिवर घट्ट रोवले गेले आहेत ती जमीन पक्की करणाऱ्या अनुभवांची लकाकी त्या बुटांना आली तर पाहणाऱ्याला देखिल मजा येतो...
आज अनेक दिवसानी मागे वळून पाहताना कितितरी चेहेरे समोर येतात....प्रत्येक माणुस ज्याने काहीतरी शिकवले...आजच्या माझ्या वॉल/स्क्रॅप/मेसेज लिस्ट मध्ये असलेल्या सर्व शुभेच्छांमध्ये या सगळ्या चेहर्यांचा देखिल वाटा आहे... .
.त्यांच्या आशीर्वाद आणि प्रोत्साहनामुळे ही गद्धेपंचवीशी पुर्ण झाली ! सर्वांना मनापासून आभार.... !
आता पुढिल वेताळ-पंचवीशीकडे वाटचाल ... !!
No comments:
Post a Comment