मागच्याच आठवड्यात वेताळ पंचविशीतील पहिले वर्ष सरले आणि अक्षरशः नावाला सार्थ करत.....
गेल्या वर्षीच लिहिल्याप्रमाणे माणसाचे बूट, त्याची लकाकी आणि ते ज्यावर उभे आहेत ती जमीन, ह्यांचा व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होतो... आणि आनंद वाटतोय की हे सगळे जसे होते तसेच राहीले आहे किंबहुना जमीनीवरची पकड थोडी जास्तच घट्ट झाली आहे.
अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे ह्या वाक्याची प्रचिती आली, आणि मग ह्या गुरुच्या सहाय्याने समोरच्या प्रत्येक शत्रुला मान झुकवण्यासाठी भाग पाडून आज मी विजय पतका फ़डकवतोय... काहींना खुशाल म्हणू दे 'मी' ची बाधा ! पण जे आहे ते आहे.... आपल्यासाठी कोण दुसरा मदत करेल हा विचारच चूक आहे, आपण इतरांसाठी काही केलं... . तर कदाचित ते आपल्यासाठी करतील... ! आणि स्वतःला स्वतःपेक्षा जास्त मदत कोणीही करू शकत नाही.... !
असो, एकंदरीत वर्ष चांगले सरले, लपाछपी खेळत काही सुवार्ता येऊन धडकल्या... , वेताळाच्या प्रतीक्षेत १ वजा झाले...आता उरलेली २४ वर्षे बघू काय काय फळे देतात... !
No comments:
Post a Comment