
काही म्हणा, पण २० तारखेला राखीपौर्णिमेनिमित्य २ तिकिटांवर १ तिकिट फ्री देण्याचा प्रमोशन फंडा आपल्याला फार आवडला... चला आजवर कोणत्यातरी सिनेमावाल्याने असे केले होते का सांगा बरं ? पब्लिक ला तर बरच आहे ना... ३ऱ्या आठवड्यातला एखादा दिवस टाका ना असा पब्लिक च्या नावने करुन, सिनेमा पण चालेल आणि लोकं पण खुश !
तर मी ई-स्क्वेअर मध्ये हा सिनेमा पहायला गेलो, आज मातोश्रींसोबत जवळ जवळ १५-१६ वर्षांनी सिनेमा पाहण्याचा योग आला..इतर वेळी आई-बाबा वेगळे आणि आम्ही आमचे मित्रमंडळी असेच सिनेमे पाहत आलोय :) !! तर सिनेमागृहात गेलो परंतु ई-स्व्केअर ने भलतीच निराशा केली हो, २ वेळा लाईट गेले, आणि सिनेमा रिळ ट्रिप झाले, आमचे २५ मिनिटे वाया....त्या मॅनेजर आणि त्याच्या सिनिअर मॅनेजरने माझी आणि बाकी लोक जमल्यावर आमची बरिच बोलणी खाल्ली !
सिनेमाची सुरुवातच हातात फावडे घेतलेल्या राहुल च्या एंट्रीने होते, आणि मग थेट सिनेमाच्या शेवटी तो सीन येतो.. मध्ये सगळा फ्लॅशबॅक आहे :) :) दादाजींच्या मृत्युनंतर गोव्याला गंमत करायला जाणारा राहुलला आजी अस्थी विसर्जनासाठीची गळ घालते, आजीला फसवण्यासाठी ट्रेन मध्ये बसून पुढिल स्टेशनवर उतरून गोवा गाठायचा प्लॅन, पण उतरताना दिपिकाला दिलेला हात, ट्रेन उतरण्यापुर्वीच सुटणे त्यातून चेन्नईजवळच्या गावत पोचणे, तिथे दिपिकाच्या होणाऱ्या नवऱ्याशी फाईट ठरणे, मग तिथून पळून जाणे आणि इतर गमती जमती, मध्यंतरीच्या लपालपित दिपिकावर प्रेम उत्पन्न होणे आणि मग शेवटी दिपिकाच्या घरी जाउन तिच्या वडिलांसमोर त्या लग्न ठरवलेल्या माणसाशी मारामारी करून दिपिकाचे स्वयंवर जिंकणे- हा सिनेमाचा गाभा.
मला तर DDLJ Returns पाहिल्यासारखा वाटला, अमरिशपुरीची जागा साउथ च्या डॉन ने घेतली होती, कुलजीत च्या ऐवजी ३ कुलजीत मिळून एक होतील असा रांगडा मनुष्य आहे आणि इथे शाहरुख चा गुरुर ललकारायला अनुपन खेर नसून त्याचे दिपिकावरील प्रेम आहे एवढाच काय तो बेसिक फरक...चित्रपट एकदा फुकट किंवा सिडीवर बघण्याच्या लायकिचा आहे, पण उणीवा खुप आहेत...आधी चांगल्या गोष्टी सांगतो मग उणीवा...
जमेची बाजू:
१) रोहीत शेट्टी स्टाईल गाड्यांच्या आणि आगीच्या करामती ठिक आहेत... उदा. गॅसस्टोव फेकल्यावर तो शाहरुखने चुकवणे पण मागिल टेबलावर तो पडून बॅकग्राउंडला प्रचंड आगिचे लोळ दाखवणे वगैरे. .. पण गाडिच्या चाकावर कोयता मारून गाडी पलटवणारा सीन म्हणजे XMen-Origins Wolverine ची कॉपी करण्याचा निष्फळ प्रयत्न वाटतो.
२) गाणी चांगली आहेत, निदान गुणगुणता येण्यासारखी तरी आहेत.
३) शाहरुखला काही काही वाक्यांत विनोदनिर्मीतीची चांगली संधी मिळाली आहे.
४) सिन सिनरी मस्त पिक्चराईझ केली आहे. कॅमेरा अँगल्स चा वापर प्रभावीपणे केलेला आहे.
आता उणीवा आणि चुका -->
१) साउथवरून पळून आलेली दिपिका गुंड मागे लागलेत म्हणून 'चेन्नई एक्स्प्रेस्' मागे कशी पळेल बरं >>?
२) त्या कोणत्याश्या गावात फक्त दिपिका, तिचा होणारा नवरा आणि एक शीख पोलिस इंस्पेक्टर ह्यांनाच हिंदी कळत असते... ?? हे पचवणे केवळ अशक्य आहे !!
३) दिपिकाचा होणारा नवरा एवढा आडदांड घेतला आहे की शाहरुखने जादुटोणा केला तरी तो त्याला मारू शकणार नाही हे पाहताक्षाणी एखादे पोरं देखील ओळखेल... त्यामुळे ही कास्टिंग टोटल फेल !!

आज नाही तर पुन्हा कधितरी... उम्मीद पे तो दुनिया कायम है !!
--
आशुतोष दीक्षित.